ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे (page 342)

ताज़ा खबरे

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापणार, मराठा महामोर्चा ‘इफेक्ट’

मुंबई: मराठा महामोर्चाचं भगवं वादळ मुंबईत धडकताच सरकार खडबडून जागं झालंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात येणार आहे. या समितीला कॅबिनेटचा दर्जा असल्याने समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेचीही गरज राहणार नाहीये. मराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल राज्य मागास आयोगाला सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादाही घालून देण्यात येणार आहे. या मंत्रिमंडळ …

Read More »

विनाकारण आमची माथी भडकवू नका…

मुंबई : कोपर्डीतील आमच्या भगिनीवर बलात्कार झाल्यानंतर मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही कोपर्डीत आला होता. त्यावेळी द्रुतगती न्यायालयात हा खटला चालवून नराधमांना फाशी देण्याचे आश्‍वासन तुम्ही दिले होते त्याचे काय झाले साहेब ? आणखी कितीवर्षे न्यायाची प्रतीक्षा करायची असा सवाल मुंबईतील मराठा मोर्चासमोर बोलताना समाजातील मुलींनी केला. त्यावेळी लाखो मराठ्यांने डोळे क्षणभर पानावले …

Read More »

हा समारोपाचा मोर्चा नाही; ही तर सुरवात : निलेश राणे

मुंबई : मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी काढलेला आजचा मुंबईतील मोर्चा समारोपाचा नाही. ही तर सुरवात आहे, असे निलेश राणे यांनी मराठा महामोर्चात सांगितले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे; तसेच त्यांचे पुत्र निलेश आणि नितेश राणे आज मोर्चात सहभागी झाले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी निलेश राणे म्हणाले, …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होईल: दानवे

मुंबई : मराठा समाजाबाबत फडणवीस सरकार आज निश्‍चितपणे ठोस भूमिका घेईल. तशी आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. भाजप आणि सरकारचा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर पाठिंबाच आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमाणे आम्ही मताचे राजकारण करणार नाही अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतली. येथे पत्रकारांशी बोलताना …

Read More »

पवना धरण 98 टक्के भरले; पिंपरी-चिंचवडकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला !

पिंपरी: पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण तुडुंब भरले आहे. धरणात 98.45 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे शहरवासियांचा एक वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मावळसह पिंपरी-चिंचवडकारांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पवना धरण परिसरात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. पाण्यात वाढ झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून …

Read More »

एसीपीजीच्या वाहनांमध्ये जीव गुदमरतो: राहुल गांधी

नवी दिल्ली : गुजरात दौऱ्यावर असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ते स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (एसपीजी) वाहने का घेऊन जात नाहीत? असा पलटवार भाजपकडून करण्यात आला होता. मात्र राहुल यांनी गेल्यावर्षीच एसपीजीची वाहने खटारा असून त्यात जीव गुदमरतो. ही वाहने आरोग्यासाठी धोकादायक आहेत, अशी तक्रार केली होती. पण त्यावर …

Read More »

बलात्काराचा प्रयत्न फसला, इमारतीवरून फेकले

नवी दिल्ली : वहिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न फसल्याने दिराने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून तिला फेकून दिलं. तिचं नशीब बलवत्तर म्हणून शेजाऱ्यांनी तिला तात्काळ रूग्णालयात नेलं आणि ती बचावली. दिल्लीच्या वजीरपूर येथे रविवारी ही धक्कादायक घटना घडली. ही महिला घरात एकटीच होती. या संधीचा फायदा घेत तिच्या …

Read More »

बिहारः तेजस्वी यादवांची ‘जनादेश अपमान यात्रा’

पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आजपासून महात्मा गांधी यांची कर्मभूमी चम्पारण येथून ‘जनादेश अपमान यात्रा’ सुरू करणार आहेत. तेजस्वी यादव यांची ही यात्रा यशस्वी व्हावी यासाठी त्यांची आई व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी तेजस्वी यांना टिळा लावून शुभेच्छा दिल्या. बिहारमधील जनतेने आरजेडी आणि जदयू या दोन पक्षांना …

Read More »

मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करा: रामदास आठवले

मुंबई: मराठा समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे, असे स्पष्ट करतानाच मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या मुंबईतील मोर्चाला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी ही घोषणा केली. मराठा समाजासह देशातील गुर्जर, …

Read More »

भाजपला धक्का; गुजरातमधून अहमद पटेल राज्यसभेवर!

गांधीनगर : काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी विजय मिळवत राज्यसभेची जागा कायम राखली आहे. तर इतर दोन जागांवर अपेक्षेप्रमाणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी विजय मिळवला आहे. पटेल यांच्या विजयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. …

Read More »