ताज़ा खबरे
Home / मनोरंजन / पदमावती: मंत्री म्हणाले, ‘आणखी सहन करणार नाही’

पदमावती: मंत्री म्हणाले, ‘आणखी सहन करणार नाही’

नवी दिल्ली। (PNE)- केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी ‘पद्मावती’ चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांनीही ‘पद्मावती’ चित्रपटावरून बॉलिवूड निर्मात्यांवर हल्लाबोल केला आहे. ‘बॉलिवूड निर्माते हिंदू गुरू, देवी-देवतांवर तसेच योद्ध्यांवर चित्रपट बनवतात. आता यापुढे आम्ही आणखी सहन करणार नाही’, असे म्हणत, ‘काय, इतर धर्मांवर आधारित चित्रपट बनवण्याची संजय भंसाळी किंवा इतर निर्मात्यांमध्ये हिम्मत आहे का?’ असा सवाल गिरिराज सिंह यांनी उपस्थित केला आहे.
सिंह पुढे म्हणाले की, चितोडची राणी पद्मावती ही हिंदू होती. याच कारणामुळे तिच्या व्यक्तिरेखेशी छेडछाड केली जात आहे. अलाउद्दीन खिलजी याची राणी पद्मावतीवर वाइट नजर होती. याच कारणामुळे त्याने चितोड नष्ट केले.

Check Also

अभिनेता सुशांत सिंह राजपुत फांसी लगाकर आत्महत्या की

मुंबई- बॉलीवुड से एक बहुत ही चौंकाने वाली खबर सामने आई है। मशहूर एक्टर सुशांत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *