ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / … तर या सरकारला खाली खेचणार: उद्धव ठाकरेंचा इशारा

… तर या सरकारला खाली खेचणार: उद्धव ठाकरेंचा इशारा

रत्नागिरी। ‘रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला शंभर टक्के यश मिळाले आणि तुम्हाला भोपळा दिला. यामुळे तुम्ही जिल्हा परिषदेला निधी देत नाही काय?, असा सवाल करत, ‘जर आमच्या मुळावर येणार असाल आणि स्वतःचेच चेहरे छापणार असाल तर हे सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा दिला आहे. रत्नागिरी येथे आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते.
राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवताना उद्धव ठाकरे यांनी आम्ही सत्तेत राहायचे की नाही असे विचारत कार्यकर्त्यांचा कौल घेतला. मात्र उपस्थितांकडून होय असे उत्तर आल्यानंतर मग, आम्ही दुतोंडी आहोत अशी आमच्यावर टीका होईल असे म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिला. ते म्हणाले, ‘आमचा आवाज ऐकणार नसाल, जनतेच्या मानातील ऐकणार नसाल, तर आम्ही मात्र जनतेला हवे तेच करणार’.
‘आपल्याला जिल्हा परिषदेत जे यश मिळाले ते टिकवणे तुमचे कर्तव्य आहे. काही लोक विष कालवण्याचा प्रयत्न करतील, मात्र तुम्ही त्यांना बळी पडू नका. आपल्यातले कोणी माझ्याशी प्रतारणा करणार नाहीत असा विश्वास तुम्ही मला द्यायला हवा’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना धोक्याची कल्पना दिली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *