नवी दिल्ली: हवेतील प्रदूषणाने श्वास कोंडलेल्या दिल्लीकरांची व्यथा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ट्विटच्या माध्यमातून मांडली. दिल्लीतील भयानक परिस्थिती आणि त्याचा येथील नागरिकांना होणारा त्रास याबाबत गझलेतील शब्दरचनेतून चिंता व्यक्त केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींच्या ट्विटची सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. शायरी आणि गझलांमधील शब्दरचनेतून केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करत आहेत. यावेळी त्यांनी ”सीने में जलन, आँखों में तूफ़ान सा क्यों है?….इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है? या ‘गमन’ चित्रपटातील गझलचा आधार घेत दिल्लीतील प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर चिंता व्यक्त केली.
Check Also
संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब
आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …