ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / कोणताही ‘पंजा’ गरिबांचा हक्क हिरावू शकत नाही; पंतप्रधान मोदी यांची कॉंग्रेसवर टीका

कोणताही ‘पंजा’ गरिबांचा हक्क हिरावू शकत नाही; पंतप्रधान मोदी यांची कॉंग्रेसवर टीका

ऊना। (PNE)- ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे, दिल्लीतून एक रूपया मंजूर झाला तर गावांमध्ये जाईपर्यंत लोकांच्या हातात केवळ १५ पैसेच पोहचतात. मला सांगा, लोकांचे पैसेमध्येच जिरवणारा हा ‘पंजा’ कुणाचा होता? देशात इतकी वर्ष कुणाचं सरकार होतं? या भ्रष्टाचाराला कोण जबाबदार आहे?’ असे सवाल करतानाच ‘आम्ही गरिबांना त्यांच्या हक्काचा पूर्ण रूपया देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोणताच ‘पंजा’ गरिबांचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रसेवर केला.
हिमाचल प्रदेश येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘यावेळच्या निवडणुकीत मजा राहिली नाही. कारण काँग्रेस मैदान सोडून पळून गेली आहे. ही निवडणूक एकतर्फी होत असल्याचं दिसत आहे’, असा टोला मोदींनी लगावला. ‘देशातील भ्रष्टाचारावर राजीव गांधी बोलले. त्यांनी आजार सांगितला. पण उपाय सांगितला नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ काँग्रेस सत्तेवर राहिली. पण त्यांनी देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी काहीच केलं नाही’, अशी टीकाही त्यांनी केली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *