नवी दिल्ली।(PNE)- गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना काँग्रेसने अधिक आक्रमक होत सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर सोशल मीडियावरून भाजपच्या नाकीनऊ आणले आहेत. ‘पोकळ भाषणं पुरे झाली. देशातील महागाई आणि बेरोजगारी नियंत्रित करा अन्यथा खुर्च्या खाली करा’, अशा शब्दात राहुल यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे.
राहुल गांधी यांनी टि्वटरवर ‘नवभारत टाइम्स’ची महागाईबद्दलची बातमी पोस्ट करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. ‘गॅस, रेशन सर्व महाग झालंय. आता पोकळ भाषणं बंद करायला हवीत. जनतेला रोजगार द्या, अन्यथा सत्ता सोडा’, असं टि्वट राहुल यांनी केलं आहे.
Home / ताज़ा खबरे / पोकळ भाषणं पुरे, आता खुर्च्या खाली करा; पंतप्रधान मोदींवर राहुल गांधी यांचा घणाघात
Check Also
संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब
आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …