पुणे। (PNE)- चित्रपटाचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहता, हॉटेलच्या रांगेत उभे राहता तर मग देशाच्या राष्ट्रगीतासाठी का उभे राहू शकत नाही, असा सवाल एफटीआयआयचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी विचारला. मुक्तछंद आयोजित प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रगीतावेळी आपण उभे राहत असलेल्या 52 सेकंदांत आपल्यावर असणारे देशाचे संस्कार दिसतात. आपण आई-वडील शिक्षक आणि ज्येष्ठाप्रती जो आदर दाखवतो, तोच देशाप्रती असायला हवा. 52 सेकंदांत आपल्यातील माणूस आणि संस्कारांचे दर्शन घडते,’ असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.